उद्वेग
उष्णता,आद्रता,घालमेल भावनांची
का होतेय आज मनात इतकी
कशा साठी तळाशी साचलेल्या
विचारांची उत्क्रांती होतेय पुनष्प
परत तीच चाहूल लागतेय
दूर गेले होते ना मी जिच्या पासून
मग का धावताहेत तेच विचार परत परत
प्रकाशाच्या गतीने,माझ्या दिशेने
बंद केलेल दार ठोठावत आहेत
निघून जा,नकोय मला तुमची संगत
अश्रू संपलेत सगळे माझ्या तळ्यातले
माझ विश्वच बदलय मी आता
तुम्हाला थारा नाही या ठिकाणी
मागे फिरा,बस तुमच भ्रमण सपलय
उद्वेग शिथिल होतो आहे दिसतय
मनाला काबूत ठेवण्याच काम मी कर शकेन का?
हा लावा खरच शांत झालाय?
मार्च 14, 2008

